Skip to main content

चुकलेली दृष्टी आणि झालेला दगड

ज्या गोष्टी आपल्या एकदम जवळ असतात त्या बहुतेक वेळा आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. डोळ्यांच्या अगदीच जवळ असल्यामुळे त्यातले बारकावे दृष्टीआड होतात. आपल्याला नेहमीच असं वाटत राहतं की त्या गोष्टीत काहीच दोष नाहीत.

माणसांचंही थोडं असंच असतं. वर्षानुवर्ष आपल्याबरोबर असणाऱ्या माणसांचं आपल्याला सगळंच बरोबर वाटतं. त्यांचे अवगुण, त्यांच्या उणिवा या नजरेआड गेलेल्या असतात, किंवा त्या अश्या कधी स्पष्ट दिसतच नाहीत. यातली काही माणसं आपली एकदम 'खास' असतात. ही अशी लोकं असतात ज्यांबद्दल आपल्याला असा दृढ विश्वास असतो की ते 'आपल्याला' चांगलं जाणतात. आपला स्वभाव, आपले विचार, आपले गुण-दुर्गुण, त्यांना सगळं माहिती असतं असं आपल्याला वाटत असतं. आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास करतो आणि आपण असं समजतो की ती व्यक्ती नेहमी 'आपल्याला' काय वाटतं याचा विचार करेल. कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय 'आपली' बाजू समजून घेईल आणि जर आपलं कुठं चुकत असेल तर नीट समजावूनही सांगेल.

हे असं सगळं आयुष्य चांगलं चाललेलं असतं, त्यांचं पण आणि आपलं पण. पण कधीकधी प्रसंगच असे उद्भवतात की डोळ्यांच्या अगदीच जवळ असलेली ती गोष्ट आणि आपल्या अगदीच जवळ असणारी ती माणसं दोन्हीही दुरावतात. यात त्या प्रसंगाचा दोष नसतो, असतो तो त्या आंधळेपणाचा जो ती गोष्ट आणि लोकं जवळ असल्यामुळे आलेला असतो. माणसं हळूहळू दूर जायला लागतात तसं तसं आपल्याला आणखी स्पष्ट दिसायला लागतं. आपल्याला कळायला लागतं की आपण जसं समजत होतो तसं कधी नव्हतंच. आपण 'आपली' म्हणणारी ती माणसं कधी 'आपल्याला' समजू शकलीच नाहीत. ज्यांच्यावरती आपल्याला विश्वास होता की ही लोकं आपल्याला समजून जर आपलं चुकत असेल तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतील, ती लोकं मात्र दुसऱ्यांचा विचार करून आपलीच दिशाभूल करताएत. बाकीचे लोकं काय म्हणतील या चुलीत 'आपल्याच' भावनांचं स्वहस्ते सरपण घालताएत.

दुःख होतं, खूप दुःख होतं जेव्हा या सगळ्याची जाणीव होते. वाटतं दूर जावं सगळ्यांपासून. माणसं हवीतच कशाला आपल्याला? पण या सगळ्यासाठी पण आता बराच उशीर झालेला असतो. कितीही नाही म्हणलं तरी या माणसांबरोबर आपण जोडले गेलेलं असतो. या सगळ्या कुचंबणेत शेवटी आपणंच मरतो. आपल्याच मनाचा एक सुंदर कोपरा बेचीराख होतो. विश्वासाला गेलेला तो तडा कधीही न भरून येणारा असतो. क्रोधाची ती धगधगती ज्वाळा ही काही काळाने शांत होते. आणि मग मागे राहतो तो केवळ एक भावनाशून्य दगड. परत कधीही न जळणारा, न पाझरणारा

Comments

Popular posts from this blog

Ramayana

When I was studying engineering, we learnt in one of the subjects that a less probable event conveys more information. 'The sun rises in the east' - hmm... ok... everyone knows this... so what? See what I mean, zero information. But when you read 'Click here to know xyz about Nick Priyanka's wedding', now that's information(according to news outlets) since the probability of a common person knowing that xyz is miniscule. [Disclaimer: The subject only dealt with quantity of information. It didn't have any theory on the quality of information.(Although I wish it did, so that I could use it to purge my news feed)]. Anyways, I am writing about probability of events because often in our lives, rare events or one-off moments are the ones which make the most impact. An unplanned trip to Lonavala will be the one of your best outings(despite a lack of candid pics which you pose for). An unexpected act of kindness remains etched in your conscience changing your o...

Silence

Outside the window, the birds are busy making merry On the other side of the wall though, silence reigns heavy  Imparting a lull, playing a comforter's role Offering solace to a disturbed soul. Looking through the other window, the one that rings Everyone is sharing about every damn thing Stamping their opinions, trying to prove their truth Not ready to listen, discussions turning uncouth. Tired of this rat race, don't want to participate anymore Open to having my views changed, there are things that I don't know Keeping my beliefs to myself, maybe I am a little green Don't want to convince anyone, opting silence over the din. But is this really why I chose to be silent? Maybe I chose to be silent because At the end what difference does it make? World goes on, people do what they want Elaborate arguments are given to justify actions What value do few kind words have among all this friction?   So, I am silent because my words don't really matter Pretending to be bett...

येऊ?...येते...

मनाचं असं एक वेगळंच मन असतं आशेच्या एका किरणाचं पण सूर्याइतकं तेज असतं वास्तविकतेनं मात्र याला खूप वेळा दुखावलं आठवणींच्या बोचऱ्या काट्यांमध्ये याला परत कसं फुलवावं? खूप त्रास झाला, खूप कष्ट पडले प्रयत्न करून मनास मी कसेतरी बांधले... "जे झाले ते चांगल्यासाठीच झाले..." अशी सारखी त्याची समजूत घालत राहिले... आणि मग त्या दिवशी... परत ते भेटणं, पूर्वीसारखं बोलणं... मनाच्या जखमेवर, हळूवार फुंकर घालत राहणं... शेवटी निघताना... मनाला घातलेला बांध  तुटू पाहत होता... निराशेच्या गर्तेत पण आशेचा आधार वाटत होता... बुद्धीच्या तर्काविरुद्ध मनाने शेवटी बंड केलेच शहाणपण बाजूला सारून वेडेपण जवळ केले... भावनांच्या भरतीला तरी मी किती वेळ थोपवून ठेवू? बोलायचं होतं बरंच काही... पण ओठी आले फक्त - "येऊ?" तो एकच शब्द, आशेने किती ओतप्रोत भरलेला तू "थांब!" म्हणशील, हे ऐकण्यासाठी जीव आतुरलेला काही क्षण असेच गेले, स्तब्ध, सुन्न शांततेत... मनाच्या जखमेवर जणू, कुणी ओढले होते वेत... शेवटी मीच परत मनाचे पंख छाटले दटावत त्याला परत जमिनीवर आणले त्याला जे पाहिजे होते ते कधी मिळणार नव्हते असं ...